Water Dispute In Sattari : सत्तरीतील पाणी समस्येबाबत लोकाधिकार मंच आवाज उठणार

गाेवा मुक्तीला साठ वर्षे पूर्ण झाली पण सत्तरीत अजूनही पाणी समस्या तशीच आहे.
Human Rights Forum
Human Rights ForumDainik Gomantak

Water Dispute In Sattari सत्तरीत गेले अनेक वर्षे पाणी समस्येवर आवाज उठविण्यासाठी सत्तरीत आता सत्तरी जलसंपदा लोकाधिकार मंचची स्थापना झाली असून यापुढे म्हादई सुरक्षित ठेवण्यासाठी व सत्तरीतील गावागावात असलेल्या पाणी समस्या सोडविण्यासाठी हा मंच काम करणार आहे.

यावेळी रामनाथ वरक यांनी सांगितले की गाेवा मुक्तीला साठ वर्षे पूर्ण झाली पण अजूनही पाणी समस्या तशीच आहे. अजूनही कित्येक गावाला टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

सत्तरीसाठी म्हादई सुध्दा महत्त्वाची आहे. त्यामुळे तिचे रक्षण करणे हे सत्तरीच्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्या उद्देशाने मंचची स्थापना करण्यात आली आहे. मंचातर्फे आज उपजिल्हाधिकारी व सत्तरी मामलेदार यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

सत्तरी तालुक्यातील पाणी समस्या साेडवा कारण सध्या सत्तरीत पाण्याची टंचाई आहे. त्यासाठी तुम्ही आम्हाला पाणी देण्यासाठी मदत करा अशी मागणी मंचातर्फे उपजिल्हाधिकारी व मामलेदार यांना करण्यात आली आहे. यापुढे मंचातर्फे प्रत्येक पंचायतीत जाउन पाणी समस्या का येते याची विचारणा करण्यात येईल तसेच गावागावात जनजागृती केली जाईल असेही वरक यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com