आपत्ती टाळण्यासाठी तिलारीकडे लक्ष देण्याची गरज

मेघश्याम राऊत यांची मागणी : पत्रकारांच्या तुकडीसह धरणाची केली पाहणी
Tilari Dam
Tilari DamDainik Gomantak

डिचोली : तिलारीकडे गोवा सरकारने गांभीर्याने लक्ष घातले आणि महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने धरणातील जलसाठ्याची पातळी वेळचेवेळी नियंत्रित ठेवली तर तिलारी धरणापासून पुराचा धोका टळू शकतो, असे मत साळ-डिचोली येथील सामाजिक कार्यकर्ते मेघश्याम राऊत यांनी व्यक्त केले.

सरकारच्या निष्काळजीपणामुळेच गेली सलग तीन वर्षे आणि त्यापूर्वीही साळसह शापोरा नदीकाठच्या गावांवर पुराची आपत्ती कोसळली होती, अशी टीकाही त्यांनी केली. राऊत यांनी डिचोलीतील पत्रकारांसह शुक्रवारी सायंकाळी तिलारी धरणाला भेट देऊन धरण परिसराची पाहणी केली.

जलसाठ्याची पातळी नियंत्रित ठेवावी

सरकारने तिलारी पाटबंधारे विभागाच्या आणि जलस्रोत खात्याच्या अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन निदान पावसाळा जवळ येताच आणि पावसाळ्यात वेळोवेळी धरणाची पाहणी करून जलसाठ्याची पातळी नियंत्रित ठेवली तर पुरासारखी आपत्ती ओढवण्याचा धोका कमी होईल. त्याचबरोबर सरकारी यंत्रणेला धावपळ करावी लागणार नाही आणि शापोरा नदीकाठची जनताही भयमुक्त होईल, असे मत राऊत यांनी व्यक्त केले.

Tilari Dam
कुयणामळ सांगेत घरात झिरपू लागले पाणी

मुसळधार पावसामुळे तिळारी तुडुंब भरले असून, धरणातून जलविसर्ग सुरू झाला आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून चार दरवाजांतून पाणी बाहेर सोडण्यात आले आहे. 113.20 मीटर ही धरणातील जलसाठ्याच्या पातळीची क्षमता आहे. शुक्रवारी सायंकाळी 7 वाजेपर्यंत जलसाठ्याची पातळी 107.30 मीटर एवढी वाढली होती. मुसळधार पाऊस पडतच राहिल्यास मोठी आपत्ती ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com