
पणजी: राज्याच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी राज्यातील कसिनोसह पर्यंटन उद्योग लसकरच सुरु केल जातील. असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Chief Minister Dr. Pramod Sawant) यांनी आज केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना मुख्यमंत्र्यानी संगितले की राज्यातील हॉटेल्स, कसिनो आदी पर्यटनाशी समंधीत उद्योग लवकर सुरु व्हावेत यासाठी सरकार विचार विनीमय करत आहे. कृती दलाची बैठक घेऊन यावर अंतीम निर्णय घेतला जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यानी यावेळी सांगितले.
दरम्यान राज्यात विदेशी व देशा पर्यटकाना ये जा करणे सुलभ व्हावे यासाठी चार्टर विमाने सुरु करण्यास परवानगी द्यावी. यासाठी आपण पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहीणार आहे. अशी माहिती बंदर खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी दिली आहे. राज्यातील पर्यटन उद्योग जेवढ्या लवकर सुरु होईल तेवढा बरा आहे. त्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत आहे. केंद्राने विमाने सुरु करण्याची परवानगी द्यावी यासाठी पत्रव्यावहार केला जाईल. असे लोबो म्हणाले. नुनीकरण केलेल्या आग्वादा किल्ल्यांचे उदघाटन 19 डिसेंबर 2021 रोजी शक्य असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या किल्याच्या उदघाटन सोहळ्याला निमंत्रीत करण्यचा प्रयत्न सुरु असल्याचे ते म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.