मडगाव : सरकारच्या सर्व योजना घरोघरी पोहोचाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, मंत्री आणि कार्यकर्ते त्यासाठी कायम प्रयत्नशील आहेत. प्रत्येक कुटुंबाला दोन ते तीन योजनांचा लाभ मिळावा, याकडेही लक्ष देणे महत्त्वाचे आहे, असे मत महिला आणि बालकल्याण मंत्री विश्वजीत राणे यांनी व्यक्त केले. मडगावात भाजपच्या महिला मोर्चाने आयोजित महिला सशक्तीकरण अभियान संमेलनात ते प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते.
भाजपकडून हे संमेलन सासष्टी तालुका आणि परिसरातील मतदारसंघात राहणाऱ्या महिलांसाठी आयोजित करण्यात आले होते. अशा प्रकारची महिला संमेलने मडगावसह म्हापसा, पेडणे, सांगे अशा् चार ठिकाणी आयोजित करण्यात आल्याचं मंत्री विश्वजीत राणे यांनी स्पष्ट केलं. यावेळी महिला स्वावलंबन योजनेअंतर्गत केलेल्या प्रशंसनीय कामाबद्दल काही महिलांचा तसेच महिला बचत गटांचा सत्कारही करण्यात आला.
भारतीय जनता पक्ष हा एक असा राजकीय पक्ष आहे, जो समाजाच्या तळागळात जाऊन काम करतो. भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दूरदृष्टी विचारसरणीचे आणि महिलांच्या विकासाला चालना देणारे आहेत. त्यांच्यामुळेच महिला आणि बालकल्याण तसेच आरोग्य खात्यामार्फत महिलांसाठी अनेक योजना सुरु करण्यात आल्या असंही राणेंनी स्पष्ट केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार सर्व लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे कर्तव्य आहे, असंही ते पुढे म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.