
Green Chilli: आपल्यापैकी अनेकांना हिरव्या मिरच्या घातलेल्या भाज्या खायला आवडते. काहींना दररोड हिरव्या मिरच्यांची चटणी खायला आवडतो. मात्र हिरव्या मिरच्यांचे अतिसेवन तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरु शकते. तुमच्या आरोग्यावर त्याचे वाईट परिणाम होऊ शकतात.
१. मानसिक स्वास्थ
गरजेपेक्षा जास्त तिखट खाल्ल्याने तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. मनावर ताण वाढण्यास आहारात सातत्याने मिरच्यांचा समावेश असेल तर कारणीभूत ठरतात.
२. आतड्यांमध्ये वेदना
हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिन नावाचे एक संयुग असते ज्यामुळे आतड्यांमध्ये वेदना होऊ शकते.
३. फॉलिक अॅसिड
हिरवी मिरची जास्त प्रमाणात खाल्ल्याने पोटात फॉलिक अॅसिडची पातळी वाढते.
४. उच्च रक्तदाब
हिरव्या मिरचीमध्ये कॅप्सेसिनच्या उपस्थितीमुळे रक्तदाब वाढू शकतो.
५. झोप न लागणे
हिरव्या मिरचीचे सेवन केल्याने झोपेची समस्या उद्भवू शकते, कारण यामुळे शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होऊ शकते.
६. अॅसिडिटी
हिरवी मिरची खाल्ल्याने अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे ते कमी प्रमाणात खा.
७. जठराची सूज
कॅप्सेसिनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने जठराची सूज होऊ शकते.
८. अतिसार
हिरव्या मिरचीचे सेवन केल्याने अतिसार होऊ शकतो कारण त्याचा आतड्यांवर वाईट परिणाम होतो.
९. टीबी
ज्या लोकांना आधीच टीबीचा आजार आहे त्यांनी हिरवी मिरची खाऊ नये कारण त्यामुळे त्रास वाढेल.
१०. तोंडात जळजळ होणे
कॅप्सेसिनचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने तोंडात जळजळ होऊ शकते.
मिरचीमध्ये कोणते पोषक घटक आढळतात
कॅप्सेसिन, अल्कलॉइड्स, फ्लेव्होनॉइड्स, फेनोलिक्स, अत्यावश्यक तेले, टॅनिन, स्टिरॉइड्स यांचा समावेश असलेल्या अनेक पोषक तत्वांचा हा समृद्ध स्रोत आहे. जर तुम्ही याचे मर्यादित प्रमाणात सेवन केले तर त्याचे तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे होऊ शकतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.