
हिवाळा सुरू होताच बाजारात खजूर दिसू लागतात. खजुराच्या सेवनाने शरीराला ऊब मिळते, यातील पोषक तत्वे तुम्हाला एक नाही तर अनेक समस्यांपासून वाचवतात. तसेच हिवाळ्यात होणाऱ्या अनेक आजारांपासूनही दूर राहता येते.
सर्दी-खोकल्यापासून रक्षण:-
हिवाळ्यात सर्दी-खोकल्याचा त्रास लोकांना होतो, ही लक्षणे दूर करण्यासाठी खजूर खूप प्रभावी आहेत. यामध्ये असलेल्या सर्व पोषक घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि सर्दी-खोकला टाळता येतो.
हाडे मजबूत ठेवा :-
हिवाळ्यात स्नायू आणि हाडांचा त्रास होतो. लोक वेदनांनी त्रस्त होतात, अशा परिस्थितीत खजूर खावे कारण त्यामध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम, फॉस्फरस, तांबे, मॅग्नेशियमचे भांडार आहे, जे हाडांच्या आरोग्यासाठी चांगले आहे. सांधेदुखीच्या रुग्णांना हिवाळ्यात जास्त त्रास होतो, यासाठी त्यांनी रोज किमान दोन खजूर खावेत.
हाय बीपीमध्ये प्रभावी :-
हिवाळ्यात तापमान कमी असते त्यामुळे रक्तवाहिन्या तात्पुरत्या आकसतात त्यामुळे रक्ताचा पुरवठा योग्य प्रकारे होत नाही आणि अशा स्थितीत रक्तदाब वाढतो. जर तुम्हाला हिवाळ्यात हाय बीपी नियंत्रणात ठेवायचे असेल तर तुम्ही रोज खजूर खाणं गरजेचं आहे.
बद्धकोष्ठतेच्या समस्येवर फायदेशीर :-
हिवाळ्यात अनेकदा बद्धकोष्ठतेच्या समस्येने लोक हैराण होतात. अशा परिस्थितीत तुम्ही प्रथिने आणि फायबरने समृद्ध खजूर खावे. यामुळे तुम्हाला खूप आराम मिळू शकतो. रात्री झोपण्यापूर्वी काही खजूर पाण्यात भिजवून सकाळी खा, यामुळे तुमची चयापचय क्रिया व्यवस्थित होईल.
अॅनिमियाचा त्रास दूर :-
हिवाळ्यात अॅनिमियाची तक्रार करणारे अनेक लोक आहेत. असे लोक खजुराच्या मदतीने अॅनिमियावर मात करू शकतात, खजूरमध्ये मोठ्या प्रमाणात लोह आढळते, त्यात असलेले फायबर आणि व्हिटॅमिन सी हे पोषक तत्व आहेत जे शरीरात लोह शोषण्यास मदत करतात
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.