आयपीएल: 13 हंगाम संपताच 14व्याची तयारीही सुरू..!; आठ ऐवजी 9 संघांच्या सहभागाची शक्यता

BCCI planning for the 14th season of IPL
BCCI planning for the 14th season of IPL

 नवी दिल्ली- आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा जल्लोष असून संपलेला सुद्धा नाही तोच चौदाव्या हंगामाची घोषणा कऱण्यात आली आहे. या हंगामाचे आयोजन भारतात केले जाणार असल्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले. सुत्रांच्या माहितीनुसार कोरोनामुळे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी या हंगामात ९ संघ सहभागी करून घेतले जाणार आहेत. 

एका मीडियाच्या वृत्तानुसार, बीसीसीआय पुढील हंगामाच्या लिलावाची तयारी करत आहे. यावेळी आणखीन एक संघ वाढवण्यात आला असून एकूण ९ संघ यावेळी खेळणार असल्याची चर्चाही आहे. कोरोनामुळे आलेला आर्थिक बोजा कमी करण्यासाठी हा प्रयत्न केला जात असल्याचे मीडिया सुत्रांचे म्हणणे आहे. गुजरात, किंवा अहमदाबाद असे नवीन संघाचे नाव असण्याची शक्यता आहे.  

याआधी एका आयपीएलच्या हंगामात ९ संघ उतरले होते. तर एका हंगामात आतापर्यंतचे सर्वात जास्त १० संघ मैदानात उतरले होते. कोची टस्कर्स, पुणे सुपरजायंट, गुजरात लायन्स यांसारख्या संघांचा समावेश होता.     
 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com