Asia Cup फायनलमध्ये भारत-पाकिस्तान येणार आमने सामने, जाणून घ्या संपूर्ण समीकरण

Asia Cup 2022: आशिया चषक 2022 च्या सुपर 4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान (IND vs PAK) ने भारताचा 5 गडी राखून पराभव केला.
Team India
Team IndiaDainik Gomantak

Asia Cup 2022: आशिया चषक 2022 च्या सुपर 4 फेरीतील दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान (IND vs PAK) ने भारताचा 5 गडी राखून पराभव केला. या विजयासह पाकिस्तान गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आला आहे. त्याचवेळी श्रीलंकेने अफगाणिस्तानसोबतचा पहिला सामनाही जिंकला आहे. सध्या तो सुपर 4 फेरीच्या गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. यासोबतच भारत आणि अफगाणिस्तानचा संघ या फेरीतील पहिला सामना हरला आहे. सुपर 4 फेरीत भारताला आता श्रीलंका आणि अफगाणिस्तानसोबत सामने खेळायचे आहेत.

आता भारतीय संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत कसा पोहोचणार?

आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी टीम इंडियाल त्यांचे उर्वरित दोन्ही सामने जिंकायचे आहेत. म्हणजेच, भारताला आपले दोन्ही सामने श्रीलंका आणि अफगाणिस्तानकडून जिंकावे लागतील. याशिवाय टीम इंडियाला त्याच्या नेट-रन रेटकडेही लक्ष द्यावे लागेल. सुपर 4 फेरीतील टॉप दोन संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत जाणार आहेत. या सुपर 4 फेरीत 6 सामने होतील, टॉप-2 मध्ये येणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल.

Team India
Ind Vs Pak Asia Cup 2022: पाकिस्तानला विजयासाठी 182 धावांचे आव्हान, विराटचे 60 धावांचे योगदान

दुसरीकडे, सुपर 4 फेरीत भारताचा सामना 6 सप्टेंबरला श्रीलंकेशी होईल, तर 8 सप्टेंबरला अफगाणिस्तानचा सामना होईल. भारतीय संघाला त्यांचे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, जेणेकरुन तिन्ही संघांचे गुण समान राहिले, तरी नेट रनरेटच्या आधारे भारताला अंतिम फेरीत स्थान मिळेल.

सध्या रन रेटचे समीकरण काय

भारताने आपले उर्वरित दोन सामने जिंकले आणि पाकिस्तानने श्रीलंकेवर मात केल्यास श्रीलंका स्पर्धेतून बाहेर पडेल. पण जर श्रीलंकेने त्यांचे पुढील दोन सामने जिंकले तर नेट रन रेट (NRR) शर्यतीत येईल. अंतिम फेरीसाठी पात्र ठरण्यासाठी भारताला पुढील दोन सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. त्यांचा सध्या -0.126 चा NRR आहे, श्रीलंका (+0.589) आणि पाकिस्तान (+0.126) प्रत्येकी दोन गुणांसह गुणतालिकेत पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Team India
Ind Vs Pak Asia Cup 2022: अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा विजय

अफगाणिस्तानही उलटू शकतो

अफगाणिस्तानला पहिल्या सामन्यात श्रीलंकेकडून पराभव पत्करावा लागला आहे. जर अफगाणिस्तानने (Afghanistan) भारत आणि पाकिस्तानविरुद्धचे दोन्ही सामने जिंकले तर ते आशिया कपमधील सर्वात मोठे अपडेट असेल. तसेच, अफगाणिस्तान त्यांचे दोन्ही सामने जिंकेल अशी आशा कमी आहे. परंतु इथे काहीही शक्य आहे.

Team India
Asia Cup 2022: शारजाह क्रिकेट ग्राउंडवर मोठा विक्रम, ऑस्ट्रेलियाच्या सिडनीने मिळवले मोठे स्थान

फायनलमध्ये भारत आणि पाकिस्तानची पुन्हा एकदा लढत होऊ शकते

जर पाकिस्तान (Pakistan) आपले दोन्ही सामने जिंकण्यात यशस्वी ठरला तर तो थेट अंतिम फेरीत पोहोचेल. याशिवाय भारताला आपले उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. यानंतर श्रीलंका (Sri Lanka) आणि अफगाणिस्तान आपले उर्वरित सामने गमावून स्पर्धेतून बाहेर होतील. अशा परिस्थितीत पुन्हा एकदा 11 सप्टेंबर रोजी आशिया कपचा अंतिम सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार आहे. जर दोन्ही संघ अंतिम फेरीत पोहोचले, तर प्रथमच आशिया कपमध्ये दोन्ही संघांमध्ये अंतिम सामना होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com