सिडनी : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला भारतीय संघ तिन्ही प्रकारातील मालिका गमावेल, असे भाकीत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉनने केले आहे. शुक्रवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातील भारतीयांच्या कामगिरीवरून वॉनने हे भाष्य केले आहे.
भारतीय संघ नऊ महिन्यांनंतर पहिला एकदिवसीय सामना खेळत असला तरी संघातील खेळाडूंकडे दोन महिन्यांच्या आयपीएलचा अनुभव होता, तरीही पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी ३७४ धावांचा खुराक ऑस्ट्रेलियन फलंदाजांना दिला. भारतीय संघाच्या या कामगिरीवर वॉनने टीका केली, माझे हे विधान घाईघाईने केले असे अनेकांना वाटेल, परंतु ऑस्ट्रेलियाचा संघ भारताविरुद्धच्या तिन्ही मालिका जिंकेल, असे ट्विट वॉनने केले आहे.
निर्धारित षटके पूर्ण करण्यासाठी भारतीयांनी घेतलेला वेळ त्यांची देहबोली बचावात्मक झाल्याचे निदर्शनात आणते हे धक्कादायक आहे. गोलंदाजीही सुमारच होती. या तुलनेत ऑस्ट्रेलियन चांगलेच आक्रमक होते. भारतीय संघाकडे केवळ पाचच गोलंदाज होते ही चिंतेची बाब आहे, तसेच फलंदाजीही खोलवर नाही, असेही वॉनने म्हटले आहे.
भारताचे माजी खेळाडू, तसेच समालोचक संजय मांजरेकर यांनीही भारतीय संघ समतोल नसल्याची टीका केली. भारतीय संघात अष्टपैलू खेळाडू नसल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय संघात असा फलंदाज हवा जो तीन ते चार षटके गोलंदाजी करू शकेल, असे सांगताना मांजरेकर यांनी ऑस्ट्रेलियाच्या स्टॉयनिस आणि मॅक्सवेल यांनी उदाहरणे दिली.
अधिक वाचा :
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.