शारजा: कोरोनाचा धोका टाळण्यासाठी तयार करण्यात आलेले ‘बायो बबल’ अर्थात सुरक्षा कवच त्याचे नियम पाळणे फारच आव्हानात्मक आहे; परंतु ते आवश्यकच आहे, असे मत दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार आणि मुंबईकर असलेल्या श्रेयस अय्यरने व्यक्त केले आहे.
कोरोना महामारीचे सावट कायम असले तरी कठीण परिस्थितीत अनेक नियमांच्या चौकटी तयार करून आयपीएलचा घाट घालण्यात आला आहे. ५४ दिवस आणि तीन शहरात रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी जैव सुरक्षा व्यवस्था तयार करण्यात आली आहे. आयपीएलशी संबंधित प्रत्येकावर बंधने असणार आहेत.
अशा परिस्थितीत आपल्याला आयपीएल खेळावी लागेल असा विचार आम्ही कधीच केला नव्हता. माणूस म्हणून पदोपदी नियम पाळणे सोपे नाही. पण आयपीएल यशस्वी करायची असेल तर आम्हा सर्वांना या सुरक्षा कवचाचे पालन करणे अत्यावश्यक आहे, असे अय्यरने सांगितले.
काय आहेत ‘सुरक्षा कवचा’चे प्रमुख नियम
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.