IPL 2022: रविचंद्रन अश्विनने सांगितले मुंबईविरुद्धच्या पराभवाचे कारण

मुंबईसमोर 159 धावांचे लक्ष्य होते
ipl 2022 ravichandran ashwin says about lost match against mumbai indians
ipl 2022 ravichandran ashwin says about lost match against mumbai indiansDainik Gomantak

राजस्थान रॉयल्सचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये मुंबई इंडियन्सच्या हातून त्याच्या संघाचा पाच विकेट्सनी पराभव केल्यानंतर सांगितले की जर धुके नसते तर, 159 धावांचे लक्ष्य पुरेसे ठरले असते. या सामन्यात विजयाची नोंद करून मुंबईने अखेर आयपीएलच्या चालू मोसमात आपले खाते उघडले आणि त्यांचा कर्णधार रोहित शर्माला 35 व्या वाढदिवसाची सर्वोत्तम भेट दिली. (ipl 2022 ravichandran ashwin says about lost match against mumbai indians)

मुंबईसमोर 159 धावांचे लक्ष्य होते ते त्यांनी 19.2 षटकात पूर्ण केले. त्यांच्याकडून सूर्यकुमार यादवने 51 आणि टिळक वर्माने 35 धावा केल्या. "मला वाटतं धुके पडले नसते तर ही धावसंख्या पुरेशी ठरली असती, पण तिथे भरपूर धुके होते. त्यामुळे खेळताना अडचणी निर्माण झाल्या.

ipl 2022 ravichandran ashwin says about lost match against mumbai indians
IPL 2022 मध्ये धमाकेदार कामगिरी, हे 2 गोलंदाज टीम इंडियात होणार दाखल

आम्ही पॉवरप्लेमध्ये चांगली कामगिरी केली आणि त्याच्यापेक्षा एक विकेट जास्त घेतली. हा पराभव दुर्दैवी असला तरी धुके असल्यामुळे चांगली खेळी करता आली नाही. चेंडू ओव्हरपिच होत होता आणि शेवटी फिरकीपटूंना खेळताना अडचणी निर्माण झाल्या. तो म्हणाला, “जेव्हा मैदानात धुक्याचा प्रभाव पडतो तेव्हा असे होते. आम्ही चांगली धावसंख्या केली होती. 10-15 धावा जास्त झाल्या असत्या तर बरे झाले असते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com