मुंबई, ता. १२ ः कोरोनाच्या आक्रमणाचा भारतीय फुटबॉलला सर्वाधिक फटका बसला आहे. यंदाच्या म्हणजेच २०२० या वर्षांत भारताचा एकही आंतरराष्ट्रीय सामना होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. जागतिक फुटबॉल महासंघाने विश्वकरंडक पात्रता लढती लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेतील आशिया विभागाच्या पात्रता लढती ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये घेण्याचे ठरले होते. या लढती लांबणीवर पडल्यामुळे अर्थातच आता भारतीय फुटबॉल सघाचे सराव शिबिरही लांबणीवर पडणार, हे निश्चित झाले आहे.
भारतीय फुटबॉल संघाचे शिबिर भुवनेश्वरला १५ ऑगस्टपासून घेण्याचा विचार होता. हे शिबिर प्रत्यक्षात १ सप्टेंबरपासून सुरू होणार होते; पण त्यापूर्वी खेळाडूंचे विलगीकरण होणार होते; पण भारतीय फुटबॉल महासंघाचे पदाधिकारी आंतरराष्ट्रीय लढती निश्चित झाल्यावरच शिबिराबाबत अंतिम निर्णय होईल, असे खाजगीत सांगत होते. त्याच वेळी पात्रता लढती अनिश्चित असल्याचे संकेत मिळत होते. अखेर आशियाई फुटबॉल महासंघाने याबाबतची अधिकृत घोषणा केली. कतारला २०२२ मध्ये होणाऱ्या विश्वकरंडक तसेच चीनमध्ये २०२३ ला होणाऱ्या आशिया कप फुटबॉल स्पर्धेच्या २०२० मध्ये होणाऱ्या पात्रता लढती २०२१ मध्ये होतील, असे आशियाई महासंघाने जाहीर केले.
भारताच्या शिल्लक लढती
एका वर्षापेक्षा जास्तीचे लॉकडाऊन
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.