IPL 2021 Orange Cap: ऋतुराज गायकवाडने ऑरेंज कॅप जिंकत रचला इतिहास

ऋतुराज गायकवाडने (Rituraj Gaikwad) सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप जिंकली.
Rituraj Gaikwad
Rituraj GaikwadDainik Gomantak

इंडियन प्रीमियर लीग 2021 (Indian Premier League 2021) च्या अंतिम सामन्यात ऑरेंज कॅपचा (Orange Cap) विजेता निश्चित झाला. ऋतुराज गायकवाडने (Rituraj Gaikwad) सर्वाधिक धावा करत ऑरेंज कॅप जिंकली. आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ऋतुराजने फक्त 2 धावांनी ऑरेंज कॅप जिंकली. ऋतुराज गायकवाडला त्याच्याच संघातील सहकारी फाफ डु प्लेसिस यांच्यात स्पर्धा लागली होती. ज्याने 633 धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने 635 धावा करत ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली.

अंतिम सामन्यात डु प्लेसिसने 59 चेंडूत 86 धावा केल्या, त्याची केवळ 2 धावांमुळे ऑरेंज कॅप जिंकण्याची संधी हुकली. दुसरीकडे, चेन्नईचा डाव संपल्यानंतर ऋतुराज गायकवाडने दिल को छु जाने वाले वक्तव्य केले. ऋतुराज म्हणाला की ऑरेंज कॅप जिंकण्याची माजी इच्छा नव्हती. डु प्लेसिसने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकायला पाहिजे होता. मात्र डु प्लेसिस शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला. जर त्याने मारलेला शॉट स्टेडीयमच्या बाहेर गेला असता तर ऑरेंज कॅप त्याची झाली असती.

Rituraj Gaikwad
IPL 2021: 'खेला होबे' म्हणत KKR ने DC ला केले गारद

ऋतुराजने आयपीएलमध्ये इतिहास रचला

ऋतुराज म्हणाला, 'मला वाटत होते की, डु प्लेसिसने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकायला पाहिजे होता कारण तो संघासाठी अधिक महत्त्वाचा ठरला असता. आपल्याला सांगू की ऋतुराज गायकवाडने ऑरेंज कॅप जिंकून इतिहास रचला आहे. ऑरेंज कॅप जिंकणारा तो आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू आहे. ऋतुराजने केवळ 24 वर्षे, 257 दिवसांच्या वयात ऑरेंज कॅप जिंकली आहे. गायकवाड यांनी 24 वर्षे 328 दिवसांच्या वयात ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या शॉन मार्शचा विक्रम मोडला. विराट कोहलीने 27 वर्षे 206 दिवसांच्या वयात ऑरेंज कॅप मिळवली. गायकवाड चेन्नई सुपर किंग्जसाठी एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडूही ठरला आहे. मायकेल हसीने 2013 मध्ये चेन्नईसाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक 733 धावा केल्या.

Rituraj Gaikwad
IPL 2021: ...म्हणून सोडले कर्णधारपद, विराटचे स्पष्टीकरण

डू प्लेसिस आणि गायकवाड यांचा गौरव

फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी आयपीएल 2021 मध्ये अप्रतिम कामगिरी केली. दोन्ही सलामीवीरांनी चेन्नईच्या फलंदाजीचा संपूर्ण भार आपल्या खांद्यावर घेतला. चेन्नईसाठी प्रथमच दोन फलंदाजांनी एका हंगामात 600 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. हा पराक्रम RCB ने दोनदा केला आहे. ख्रिस गेल आणि विराट कोहलीने (Virat Kohli) 2013 मध्ये आणि विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने 2016 मध्ये हा पराक्रम केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com