Sachin Tendulkar: ENG विरुद्धच्या दारुण पराभवानंतर क्रिकेटचा देव म्हणाला...

Team India: भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.
Sachin Tendulkar
Sachin TendulkarDainik Gomantak

Sachin Tendulkar On Indian Team: भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडविरुद्ध दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. यानंतर टीम इंडियावर सर्वत्र टीका होत आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यातच आता, इंग्लंडविरुद्धच्या दारुण पराभवानंतर क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरची पहिली प्रतिक्रीया आली आहे. त्याने टीम इंडियासाठी मोठी गोष्ट सांगितली आहे.

सचिन तेंडुलकरने हे वक्तव्य केले

भारताचा महान खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) म्हणाला की, 'इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीतील पराभव खूपच निराशाजनक आहे. अ‍ॅडलेड ओव्हलमध्ये 168 धावांचे लक्ष्य पुरेसे नव्हते, कारण मैदानाचा आकार असा आहे. सीमा लहान आहेत. आम्ही विकेट घेऊ शकलो नाही. इंग्लंड हा तगडा संघ आहे. 10 विकेट्सनी पराभूत होणे हा खूपच निराशाजनक पराभव आहे.'

Sachin Tendulkar
T20 World Cup: पराभवानंतरही टीम इंडिया मालामाल, मिळणार एवढे पैसे

खेळाडूंनाही चांगली कामगिरी करायची आहे

सचिन पुढे म्हणाला की, 'फक्त एका सामन्याच्या आधारे तुम्ही कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचू शकत नाही. टीम इंडिया टी-20 क्रिकेटमधला नंबर वन संघ आहे. हे एका रात्रीत घडत नाही. इथपर्यंत पोहोचण्यासाठी दीर्घकाळ चांगले क्रिकेट खेळावे लागते. खेळाडूंनाही बाहेर जाऊन अपयशी व्हायचे नव्हते. खेळात चढ-उतार येतच राहतात. यात आपण एकत्र असायला हवे.'

टीम इंडियाचा लाजिरवाणा निरोप

2022 च्या टी-20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावण्याचा प्रबळ दावेदार म्हणून भारतीय संघाकडे पाहिले जात होते. पाकिस्तानचा (Pakistan) 4 विकेट्सने पराभव करत टीम इंडियाने चांगली सुरुवात केली, पण दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 5 विकेट्सने पराभव झाल्यानंतर टीम इंडियाची गाडी रुळावरुन घसरली. त्यानंतर बांगलादेशविरुद्ध टीम इंडियाला (Team India) विजयासाठी झगडावे लागले. तर उपांत्य फेरीत भारताला इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला.

Sachin Tendulkar
T20 World Cup: 'Bye Bye India...', भारताच्या पराभवावर पाकिस्तानची मिस्ट्री गर्ल म्हणाली

इंग्लंडविरुद्ध पराभूत

उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 168 धावा केल्या. तर इंग्लंडने एकही विकेट न गमावता सहज लक्ष्याचा पाठलाग केला. भारतीय गोलंदाज चांगले प्रदर्शन करु शकले नाही. त्याचवेळी रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत यांनाही चांगली फलंदाजी करता आली नाही. याच कारणामुळे भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com