
T-20 World Cup: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या सुट्टीवर आहे. तो सध्या फॉर्ममध्येही नाही. परंतु त्याच्याकडून आलेल्या एका वक्तव्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये नवचैतन्य आणलं आहे. भारतासाठी आशिया चषक आणि टी-20 विश्वचषक जिंकायचा आहे, असे त्याने म्हटले आहे. गेल्या तीन वर्षांत विराटला मोठी कामगिरी करता आलेली नाही. परंतु तो कोणत्या प्रकारचा विचार करु शकतो याची कल्पना तुम्हाला यावरुन आली असेलच.
दरम्यान, 33 वर्षीय विराट कोहलीला (Virat Kohli) इंग्लंड दौऱ्यावर असताना म्हणावी तशी कामगिरी करता आली नाही. मग ती मर्यादित षटकांची मालिका असो किंवा दीर्घ फॉरमॅटमधील एकमेव सामना असो. पुढील महिन्यात सुरु होणारा आशिया चषक, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होणारा टी-20 विश्वचषक (T-20 World Cup) आणि पुढील वर्षी होणार्या 50 षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत विराट मोठी कामगिरी करु शकतो. कारण सध्या भारताकडे (India) त्याच्यापेक्षा अधिक अनुभवी फलंदाज नाही.
दुसरीकडे, विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती घेणे योग्य मानले. निवड समितीनेही त्याला पाठिंबा दिला. विराट कोहली आता एकतर झिम्बाब्वेविरुद्धच्या (Zimbabwe) तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत दिसू शकतो किंवा यूएईमध्ये खेळल्या जाणार्या आशिया चषक 2022 मध्ये थेट दिसू शकतो. स्पर्धा जिंकण्यासाठी काहीही करु शकतो, असे त्यांनी म्हटले आहे.
शिवाय, आशिया कप ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने विराट कोहलीच्या एका वक्तव्याचा हवाला दिला आहे. यामध्ये विराटने म्हटले आहे की, 'भारतासाठी आशिया चषक आणि विश्वचषक जिंकणे हे माझे मुख्य उद्दिष्ट असून यासाठी मी काहीही करण्यास तयार आहे.'
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.