विश्वचषकाच्या तब्बल 15 महिन्यानंतर महिला संघाला मिळाली बक्षीसाची रक्कम

BCCI.jpg
BCCI.jpg

मुंबई : ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या महिला टी -20 विश्वचषकाच्या (Women's t20 World Cup) 15 महिन्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) खेळाडूंना बक्षिसाची रक्कम (Prize Money) दिली आहे. या स्पर्धेत भारतीय महिला संघ उपविजेते ठरला होता. बीसीसीआयने महिला संघाला साडेतीन कोटी रुपये दिल्याची माहिती दिली आहे. 

माध्यमांकडून मिळलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी मार्चमध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी -20 विश्वचषकात आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलने उपविजेत्या संघाला साडेतीन कोटी रुपयांचे बक्षीस देण्यात आले होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलच्यावतीने स्पर्धा संपल्यानंतर आठवडाभरात ही रक्कम बीसीसीआयकडे पाठवण्यात आली होती, जेणेकरून ती खेळाडूंना देण्यात येईल. परंतु, बीसीसीआयने ही रक्कम स्पर्धेत सहभागी खेळाडूंना वितरित केली नाही.अशी माहिती यूकेच्या एका वृत्तपत्राने दिली आहे. 

भारतीय महिला संघ इंग्लंडविरुध्दच्या मालिकेसाठी इंग्लंडमध्ये आहे. महिला संघ इंग्लंडविरुद्ध 16 जूनपासून एक कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी- 20  सामन्यांची मालिका खेळणार आहे. सध्या संघ ब्रिस्टलमध्ये विलगीकरणात आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com