WTC Final मध्ये पोहोचण्याची टीम इंडियाला मोठी संधी, 'कॅप्टन'ने केली भविष्यवाणी!

Border Gavaskar Trophy: ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांची मोठी धावसंख्या उभारली. सलामीवीर उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 180 धावांचे योगदान दिले.
Team India
Team IndiaDainik Gomantak

IND vs AUS 4th Test, Sourav Ganguly Post: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी कसोटी मालिकेतील चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे.

ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांची मोठी धावसंख्या उभारली. सलामीवीर उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 180 धावांचे योगदान दिले.

त्याने 422 चेंडूंच्या संयमी खेळीत 21 चौकार मारले. दरम्यान, टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एक ट्विट केले आहे.

भारतीय संघ अजूनही खूप मागे आहे

अहमदाबाद कसोटीत 2 दिवसांचा खेळ झाला आहे. सलामीवीर उस्मान ख्वाजा (180) आणि कॅमेरुन ग्रीन (114) यांच्या शानदार शतकांमुळे ऑस्ट्रेलियाने 480 धावा केल्या.

दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा (Australia) डाव आटोपला. यानंतर दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने 10 षटकांत 36 धावा केल्या होत्या.

कर्णधार रोहित शर्मा 17 आणि युवा सलामीवीर शुभमन गिल यष्टीमागे 18 धावा करुन क्रीझवर होते. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने शानदार कामगिरी करत 91 धावांत 6 बळी घेतले. भारत सध्या ऑस्ट्रेलियापेक्षा 444 धावांनी मागे आहे.

Team India
India vs Australia: अहमदाबाद कसोटीनंतर कसे असेल WTC Final चे समीकरण? भारत-श्रीलंका संघात शर्यत

WTC फायनलसाठी हा सामना महत्त्वाचा आहे

भारतीय संघाला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC Final) अंतिम फेरीचे थेट तिकीट मिळवायचे असेल, तर अहमदाबाद कसोटी जिंकावी लागेल.

ऑस्ट्रेलिया आधीच WTC फायनलमध्ये पोहोचला आहे. हा सामना अनिर्णित राहिला तर टीम इंडियाला श्रीलंका आणि न्यूझीलंडच्या सामन्यांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल आणि अनुकूल निकालाची आशा करावी लागेल.

Team India
India vs Sri Lanka: WTC Final मध्ये पराभवानंतर क्रिकेट प्रेमींचं लक्ष्य भारताच्या युवा फळीकडे

गांगुलीने पोस्ट केले

दरम्यान, बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी ट्विट करुन या पद्धतीचा खुलासा केला आहे. अश्विनने कमाल दाखवली असून आता भारतीय फलंदाजांना मोठी संधी असल्याचे गांगुलीने म्हटले आहे.

त्याने लिहिले, 'चांगल्या खेळपट्टीवर अश्विनला इतकी चांगली गोलंदाजी करताना पाहणे आश्चर्यकारक आहे. आशा आहे की, हा एक चांगला कसोटी सामना असेल. काही कठीण विकेट्सनंतर या मालिकेत भारतीय फलंदाजांना फलंदाजी करण्याची चांगली संधी आहे.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com