'माझ्याकडून चूक झाली...' अखेर महाराष्ट्राच्या राज्यपालांचा माफीनामा

मागील आठवड्यात महाराष्ट्रावर वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केले होते. त्याच वादग्रस्त विधानांमुळे भगतसिंह कोश्यारी चर्चेत होते.
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh KoshyariDainik Gomantak

मुंबई : मागील आठवड्यात महाराष्ट्रावर वादग्रस्त वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केलं होतं. त्याच वादग्रस्त विधानांमुळे भगतसिंह कोश्यारी खूप चर्चेत होते. अनेक क्षेत्रातून त्यांच्यावर टिका करण्यात आली. त्यानंतर अखेर आज माझी चूक झाली म्हणत कोश्यारींनी आपल्या वक्तव्याबाबात माफी मागितली आहे. अनेकदा वादग्रस्त राहिलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मुंबई आणि महाराष्ट्रावर केलेल्या वक्तव्याने पुन्हा एकदा चर्चेत आले होते. (Bhagat Singh Koshyari Statement)

'गुजराती लोक मुंबईतून गेले तर पैसे राहणार नाहीत. आर्थिक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे, ती राहणार नाही, असे वक्तव्य करुन त्यांनी नवा वाद ओढावून घेतला होता. यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल त्यांनी वादग्रस्त विधानं केली आहेत.

Bhagat Singh Koshyari
महाराष्ट्रात बनणार 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था: राज्यपाल कोश्यारी

भारतीय राजकारणात गव्हर्नरची भूमिका दीर्घकाळापासून वादाचा विषय आहे. उत्तर प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल रोमेश भंडारी यांचा वादग्रस्त निर्णय आणि त्यांच्या विरोधात अटलजींनी केलेले उपोषण, केरळचे विद्यमान राज्यपाल आरिफ मोहम्मद किंवा मध्यप्रदेशचे राज्यपाल राहिलेले राम नरेश यादव यांच्या कुटुंबीयांकडून केलेली विधाने. या सगळ्यामुळे या पदाच्या भूमिकेवर कुठेतरी प्रश्न उपस्थित होत आहेत.

अशातच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानावरून महाराष्ट्रात वादंग निर्माण झाला होता. एका कार्यक्रमात त्यांनी महाराष्ट्रातील लोकांना गुजराती आणि राजस्थानी लोकांबरोबर तुलना करून दुय्यम लेखले होते. याला महाराष्ट्रातील जनतेचा अवमान करणारे विधान म्हणत सर्वच राजकीय पक्षांनी विरोध सुरू केला होता.

Bhagat Singh Koshyari
"गुजराती लोक गेले तर मुंबईची ओळख राहणार नाही", राज्यपाल कोश्यारींच्या वक्तव्याने नवा वाद

एवढेच नाही तर राज्यपालांच्या विधानाशी भाजपच्या एक-दोन नेत्यांनी असहमत दाखवली. नुकतेच भाजपच्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री झालेले एकनाथ शिंदे यांनीही राज्यपालांच्या विधानाशी असहमती दर्शवली. मात्र, कोश्यारी यांनी आपले विधान मागे घेत मराठी लोकांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com