कामावर उशीरा जाताय? मग सरकारकडून होणाऱ्या कारवाईसाठी तयार रहा

If the employees of the Mantralaya in Mumbai report late for work more than twice in a month will have to face action
If the employees of the Mantralaya in Mumbai report late for work more than twice in a month will have to face action

मुंबई :  महाराष्ट्र शासनाने अलीकडेच आपल्या कामावर उशीरा येण्याशी संबंधित नियमावलीमध्ये बदल केला आहे. महिन्यातून दोनदा उशिरा आलेल्या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. महाराष्ट्र मंत्रालयातील उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता महिन्यातून दोनदा उशीरा आल्यास कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. या कारवाईमध्ये त्यांच्या रजा कमी होऊ शकतात किंवा पगारातून काही रक्कम वजा केली जाऊ शकते, असे सरकारतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या सूचनेत नमूद केले आहे. 

महाराष्ट्र शासनाचे प्रशासकीय मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील कामाची दैनंदिन वेळ ही  नोंदवण्याचा सामान्य वेळ पहाटे 9 वाजून 45 मिनिटे आहे. परंतु कर्मचार्‍यांना यात 60 मिनिटांची लवचिकता देण्यात आली आहे. पण आता नव्या नियमांनुसार आता सकाळी 10.45 ते दुपारी 12.15 दरम्यानची वेळ उशिर म्हणून नोंद करण्याय येईल. परिपत्रकानुसार असे झाल्यास त्यांना अर्ध्याच दिवसाचा पगार मिळेल.महिन्यातून दोनदा सकाळी ११.१5 नंतर मंत्रालयात कामासाठी उशीरा येणाऱ्यांना प्रत्येक उशिरासाठी एक रजा गमवावी लागेल, असेही त्यात नमूद केले आहे. 

परिपत्रकात असेही म्हटले आहे की, लोकल, रेल्वे सेवा विस्कळित झाल्याने उशीर झाल्यास अशी वैध कारणे स्विकारली जातील. प्रत्येक विभागांचे प्रमुख (एचओडी) दर महिन्याला आपल्या कर्मचाऱ्यांची मासिक उपस्थिती तपासतील.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com