नितेश राणेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर पत्राद्वारे खरमरीत टीका

नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे.
Nitesh Rane
Nitesh Rane Dainik Gomantak

पावसाळ्यात मुंबईतील अनेक ठिकाणी पाणी साचते. परिणामी नागरिकांची गैरसोय होते. या आधीच्या पावसाळ्यात अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. हे थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना म्हणून मुंबई महापालिकेत सत्तेत असणारी शिवसेना काहीही करू शकलेली नाही, अशी टीका भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. (Nitesh Rane writes letter to CM Uddhav Thackeray)

Nitesh Rane
केतकी चितळेच्या अडचणीत वाढ! वादग्रस्त पोस्टप्रकरणी आणखी तीन एफआयआर

नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले आहे. यावर्षी भरपूर पाऊस होण्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत. तुंबणाऱ्या या मुंबईत 386 असे धोक्याची ठिकाणं आहेत ज्याला आपण फ्लडींग पॉईंटस म्हणतो. यापैकी 28 ठिकाणं एकाच पश्चिम विभागतील आहेत. यावर्षी पावसाळ्यात समुद्राला 22 दिवस भरतीही असणार आहे. त्यामुळे मुंबईत सलग 250 मिली पेक्षा अधिक पाऊस पडला तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल का काय? अशी भिती नितेश राणे यांनी पत्रात व्यक्त केली आहे.

राज्य सरकार व पालिका प्रशासन या संवेदनशील मुद्यावर विविध विभागांचे मत लक्षात घेता काही धोरण आखणार आहे का? तेथील नागरिकांना अशा संभाव्य आपतीजन्य परिस्थिती काय उपाययोजना करायच्या असतात या विषयी आपण काही जनजागरण केलं आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com