एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढणं योग्य नाही; राजू शेट्टी

विमा कंपन्यांनी (Insurance company) शेतकऱ्यांसह (farmers) राज्य आणि केंद्राची तिजोरी लुटली असून यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील सहभाग आहे.
Raju Shetty
Raju ShettyDainik Gomantak

एसटी कर्मचारी (ST) करत असलेला संप योग्यच असून एसटी कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी राज्य सरकारकडून संप मोडून काढण्याची भाषा केली जात आहे. आणि हे योग्य नाही.

सध्या भाजप (BJP) एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा देत आहे. मात्र त्यांच्या काळात देखील त्यांनीच एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढला होता असा टोलाही राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी भाजपला लगावला.

Raju Shetty
एस टी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य करा नाही तर...:सदाभाऊ खोत

जालन्यात माध्यमांशी बोलत असताना राजू शेट्टी म्हणाले, अतिवृष्टीच अनुदान अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेले नाही. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसत आहे. असेही ते म्हणाले.

केवळ घोषणा करायच्या आणि पीकविमा कंपन्यांना (Crop insurance) मोकाट सोडायचे असे काम महाविकास आघाडी सरकार करत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांसह राज्य आणि केंद्राची तिजोरी लुटली असून यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांचा देखील सहभाग आहे. पीकविमा कंपन्या नफेखोर झाल्या असून प्रशासनातील (administration) काही लोकांचा सहभाग असल्याचं देखील शेट्टी यांनी म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com