शिवसेना खासदार संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे : संजय राऊत
Sanjay Raut
Sanjay Raut Dainik Gomantak

काश्मीर खोऱ्यात एकामागून एक हिंदूंच्या वाढत्या टार्गेट किलिंग आणि निर्दयी हत्यांमुळे काश्मिरी पंडित पलायन करत आहेत. सतत निदर्शने सुरू असून काश्मिरी हिंदूंना जबरदस्तीने स्थलांतरित करण्यास भाग पाडले जात आहे. दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना संजय राऊत म्हणाले की, काश्मीर पुन्हा एकदा जळत आहे आणि आमचे सरकार चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतले आहेत. (sanjay raut slams central government)

Sanjay Raut
काश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील : मुख्यमंत्री ठाकरे

परिस्थिती नियंत्रणाबाहेर
शिवसेना नेते राऊत म्हणाले, काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. काश्मिरी पंडित आणि हिंदू समाजासोबतच देशाच्या सुरक्षेसाठी काम करणाऱ्या मुस्लिम बांधवांच्याही हत्या होत आहेत. काश्मीरचे हजारो पंडित आता आपल्याच देशात सुरक्षित नाहीत. सरकार काय करत आहे?

Sanjay Raut
महाराष्ट्रात सार्वजनिक ठिकाणी मास्क अनिवार्य

काश्मिरी पंडितांसोबत महाराष्ट्र सरकार
राऊत म्हणाले, "महाराष्ट्र सरकार काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि पलायनाबद्दल चिंतेत आहे. आमचे सरकार काश्मिरी पंडितांच्या पाठीशी असेल आणि त्यांना शक्य ती मदत करेल.

आदित्य ठाकरे 15 जूनला अयोध्येला भेट देणार
राऊत म्हणाले, मी आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे आज अयोध्येला जात आहोत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे 15 जूनला अयोध्येला भेट देणार आहेत. या यात्रेमागे कोणताही राजकीय अजेंडा नसल्याचे ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com