औरंगाबाद नाही.. संभाजीनगर ! काय म्हणाले आदित्य ठाकरे..

Shiv Sena leader and environment minister Aditya Thackeray over the long pending demand and proposal to rename Aurangabad as Sambhaji Nagar
Shiv Sena leader and environment minister Aditya Thackeray over the long pending demand and proposal to rename Aurangabad as Sambhaji Nagar

मुंबई : औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करण्यावरून महाआघाडीत सुरू असलेल्या वादावर पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी नामांतरावर नक्कीच तोडगा निघेल, असा विश्‍वास केला आहे. औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा करत संभाजीनगरच्या दौऱ्यावर जाणार असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

सत्तेत असताना काही काम केले नाही, असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात भेट देऊन आज आदित्य ठाकरे यांनी शहरातील विकासकामांचा आढावा घेतला. त्या वेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी औरंगाबादच्या नामांतरावर भाष्य करत भाजपला चिमटा काढला. पाच वर्षे सत्तेत असताना काही केले नाही आणि आता आरडाओरडा करत आहेत. भाजपची ही दुटप्पी भूमिका असल्याची टीकाही त्यांनी केली. 

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com