"यातच कळालं, पाणी कुठे आणि किती मुरलयं" अरविंद सावंतांचं राणेंवर टीकास्त्र

Shiv Sena Leader Arvind Sawant criticized Rane
Shiv Sena Leader Arvind Sawant criticized Rane

मुंबई: गृहमंत्री अमित शहा यांनी सिंधूदूर्ग येथे केलेल्या भाषणाची शिवसेचे खासदार अरविंद सावंत यांनी दोरदार खिल्ली उडवली आहे. शिवसेनेला कोणतेही वचन दिले नव्हते. असे अमित शहा सांगत आहेत. त्यांना हे सांगायला सव्वा वर्ष लागले. यातच कळून येते की, पाणी कुठे आणि किती मुरले ते, असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी गृहमंत्र्यांवर  लगावला आहे. 

त्याचबरोबर भाजप नेते नारायण राणे आयत्या बिळावर नागोबा आहेत जिथे सत्ता तिथे राणे. हिंदुत्वाचा विचार आणि तत्व अमित शहांनी ज्यांच्या व्यासपीठावरून मांडली त्यांनी सरड्यालाही लाज वाटेल इतके रंग बदलले आहेत, अशा शब्दात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी राणे आणि शहांवर टीकास्त्र  सोडले आहेत.

नारायण राणेंच्या सोबत बसलेले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना विचारायला हवे होते की राणेंबाबत सभागृहात काय म्हटले होते?, नारायण राणेंनी भाजपला गुंडांचा पक्ष आहे असे म्हटले होते. त्यावर फडणवीसांनी राणे कसे गुंड आहेत हेही सांगितले होते. त्यामुळे दोन गुंड एकाच व्यासपीठावर आले हे दिसले असल्याचे म्हणत सावंत यांनी फडणवीसांवरही निशाणा साधला आहे.

राणेंना केंद्रीय मंत्रिमंडळात घेतले तरी काही फरक पडणार नाही, कालचा गुंड आज मंत्री कसा झाला? याचे उत्तर त्यांनाच द्यावे लागेल, असेही सावंत यांनी म्हटलेआहे.दरम्यान, माणसांना धमक्या देऊन पक्षात घ्यायचे हेच भाजपचे काम आहे असा आरोप अरविंद सावंत यांनी भाजपवर केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com