दैनिक गोमन्तक
गुलकंद खाल्ल्याने पोटाला थंडावा मिळतो आणि तोंडात आलेली उष्णताही कमी होते
गुलकंदामध्ये विटामिन बी चे प्रमाण अधिक असते.
रोज तुम्ही एक चमचा गुलकंदाचे सेवन केल्यास, शरीरामध्ये थंडावा निर्माण होऊन डोळ्यांच्या उष्णतेची ही समस्या दूर होण्यास मदत मिळते.
गुलकंद हे गुलाबाच्या पाकळ्यापासून बनवले जाते हे सर्वांनाच माहीत आहे, ज्या अत्यंत गुणकारी असतात.
गुलकंदाचा थंडावा थकवा दूर करण्यासाठी अधिक प्रभावी ठरतो.
शिवाय गुलकंद खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत मिळते असेही सांगण्यात येते.
जर कोणाला बद्धकोष्ठाची समस्या असेल तर जेवल्यानंतर एक ते दोन चमचे गुलकंदाचं सेवन करावं.
गुलाबपाण्यानेच नाहीतर गुलकंद खाल्ल्यानेही मुरुम कमी होण्यास मदत मिळते.