गोमन्तक डिजिटल टीम
जेव्हा ताप येतो तेव्हा शरीराचे तापमान खूप वाढलेले असते. हे तापमानाचे संतुलन राखण्यासाठी तुम्ही पाणी पिणे आवश्यक असते.
ताप आल्यानंतर डोक्यावर ओल्या पट्ट्या ठेवल्यास शरीरातील उष्णता कमी होते.
ताप आल्यानंतर जाणवणारी एक समस्या म्हणजे घसा दुखणे किंवा घसा घवघवणे. यासाठी तुम्ही कोमट पाणी घेऊन त्यात चिमूटभर मीठ टाकून त्या पाण्याने गुळण्या करा.
तापामध्ये आपल्याला थकवा जावणतो. अशावेळी चांगला आराम म्हणजे बेड रेस्ट घेणे आवश्यक ठरते.
घट्ट किंवा तंग कपड्यांमुळे आपल्या शरीरातील उष्णता तिथेच कोंडली जाते त्यामुळे सैल कपडे घालावेत