नवी दिल्ली : भारताने इंग्लंडला 317 धावांनी पराभूत केले. भारतीय गोलंदाज अक्षर पटेलने आश्चर्यकारक गोलंदाजी केली आणि इंग्लंडच्या क्रिकेट संघाच्या 5 विकेट घेतल्या. अशा प्रकारे त्याने इंग्लंड क्रिकेट संघाचा कणा मोडला. या कसोटी सामन्यात 317 धावांनी मिळविलेला विजय हा एक मोठा विजय असल्याचे वर्णन केले जात आहे, आणि आता भारत व इंग्लंडची ही कसोटी मालिका १-१ने बरोबरीत आली आहे. दोन्ही संघांमध्ये चार कसोटी सामने होणार आहेत. या विजयाबद्दल बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही ट्विट केले आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाबद्दल अमिताभ बच्चन खूप उत्सुक आहेत आणि त्यांचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे.
भारतीय क्रिकेट संघाच्या विजयाबद्दल "ये ... भारत हा सामना 317 धावांनी जिंकला ... कसोटी सामन्यात 317 धावांनी पराभूत ... हे आश्चर्यकारक आहे… मुळे आधीच उपटलेली होती. आता मुळांना उपटून टाकले आहे! इंडिया इंडिया इंडिया," असे ट्विट अमिताभ बच्चन यांनी केले आहे. हे ट्विट सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
भारत विरुद्ध इंग्लंडच्या या कसोटी सामन्यात अश्विनने 3 विकेट घेतले आणि कुलदीपने 2 गडी बाद केले. अश्विनने कसोटी सामन्यात शानदार प्रदर्शन केले. भारताच्या दुसर्या डावात त्याने फलंदाजीदरम्यान शतक झळकावले आणि 104 धावा करण्यात तो यशस्वी झाला. तिथेच इंग्लंडच्या पहिल्या डावात 5 विकेट घेण्यासही त्यांना यश आले.
दरम्यानरविचंद्रन अश्विनने लॉरेन्सला बाद करत आजच्या दिवसाची चांगली सुरूवात केली. भारताने दिलेल्या 482 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने भारताविरुद्धच्या दुसर्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी मंगळवारी दुपारच्या जेवणापर्यंत सात विकेट्सवर 116 धावा केल्या होत्या. भारताकडून रविचंद्रन अश्विनने तीन अक्षर पटेल पाच विकेट घेत कमाल खेळ केला. तर, कुलदिप यादवने 2 विकेट घेत आलं योगदान दिलं. इंग्लंडकडून मोईन अलीने सर्वाधिक 43 धावा केल्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.